natural agriculture farming केंद्र शासनाच्या माध्यमातून अडीच हजार कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीसह देशभरातील साडे सात लाख हेक्टर क्षेत्रावर एक कोटी शेतकऱ्यांच्या सहभागासह राबवली जाणारी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन (NMNF) योजना अखेर महाराष्ट्र राज्यात देखील राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
natural agriculture farming
यामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

योजनेची अंमलबजावणी
या योजनेची अंमलबजावणी मिशन मोडवर केली जाईल. यासाठी राज्य शासनाने एक यंत्रणा स्थापन करण्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्यस्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती आणि तालुका स्तरीय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, निधी वितरित करणे आणि योजनेचे प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हे कार्य केले जाईल.
हे ही पाहा : मोफत गाडी divyang e rickshaw online apply 2025
- राज्यस्तरीय समिती:
या समितीचा मुख्य कार्य राज्यात राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाची अंमलबजावणी सुनिश्चित करणे, वार्षिक कृती आराखडा तयार करणे आणि त्या आराखड्याला मंजुरी देणे हे असेल. - जिल्हास्तरीय समिती:
जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येईल. यामध्ये जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करणे आणि राज्य स्तरीय कक्षास माहिती पुरविणे हे कार्य करण्यात येईल. - तालुका स्तरीय समिती:
तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन करणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे हे कार्य करण्यात येईल.

👉बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज सुरु, करावे लागणार हे काम…👈
केंद्र सरकारचा निधी
natural agriculture farming केंद्र सरकारने या योजनेसाठी 25 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा उपयोग शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची पद्धत अवलंबवण्यासाठी, स्वतःचे बियाणे तयार करण्यासाठी, रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केला जाईल.
हे ही पाहा : पंतप्रधान स्वनिधी योजना 2025
शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान
योजनेसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 15,000 ते 20,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. यामध्ये बियाणे तयार करणे, जैविक खतांचा वापर आणि इतर नैसर्गिक शेतीच्या पद्धतींसाठी मदत केली जाईल.

हे ही पाहा : या महिला लाभार्थ्यांची होणार तपासणी
आगामी प्रक्रिया
natural agriculture farming योजनेसाठी पुढील SOP (Standard Operating Procedures) आणि मार्गदर्शक सूचना लवकरच राज्य शासनाद्वारे निर्गमित केल्या जातील. शेतकऱ्यांना अधिक माहितीसाठी या योजनेंचे अपडेट्स वेळोवेळी दिले जातील.
हे ही पाहा : मिळेल ट्रू बॅलन्समधून 20000 रुपयाचे झटपट लोन
माहिती मिळवण्यासाठी
या योजनेची अधिक माहिती आणि जीआर (Government Resolution) तुम्ही maharashtra.gov.in या वेबसाईटवर पाहू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.

हे ही पाहा : तुमचा पीकविमा मंजूर आहे का ?
natural agriculture farming या योजनेंच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक शेती पद्धती अवलंबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली जाईल, ज्यामुळे त्यांच्या उत्पादनांमध्ये वाढ होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.